कोरलेले
पुसता सहज येते
ह्र्दयात कोरलेले
मिटता कधी न येते
असतेच विश्व छोटे
अदृष्य कधी कधी ते
आकाश चांदण्याचे हे
कधी विझत नसते
येतात ऋतू किती नि
वय ओघळून जाते
मन कोवळे क्षितीजी
विभ्रमात दंग असते
म्हणतात शाप कुणी
वरदान तेच असते
असती भाग्यवंत जे
स्वप्न तयास भेटते
पाहून तयास प्रिय
पुन: पुन्हा धन्य व्हावे
जे भेटले जीवलग
उरात सदा जपावे
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा