रविवार, ३० जून, २०१९

डॉक्टर शेखर वामन फुलपगार .



डॉक्टर शेखर वामन फुलपगार .

आपले एक मित्रांचे कोंडाळे असते
 त्यातील बहुतेक मित्र हे
आपले आपल्या सारखे
आपल्या मार्गाने चालणारे
आपल्यासारखा विचार करणारे
असे असतात पण
त्यात एक वेगळा मित्र असतो
तो बंडखोर खोडकर आणि
बेधडक स्वभावाचा असतो

आमच्या मित्रांच्या कोंडाळ्यात
डॉक्टर शेखर फुलपगार असा एक
आगळावेगळा मित्र आहे .
खरंतर हे एक अगम्य अद्भुत असे
वेगळे रसायन आहे,
जे भल्याभल्यांनाही कळत नाही.
कुणाला तो उद्धट वाटतो
कोणाला रागीट
कुणी त्याला विक्षिप्त हि म्हणते
तर कुणाला अतिशय जीवलग
आणि जीवाला जीव देणारा असा वाटतो .
कोणाला तो अतिशय धूर्त
आणि आतल्या गाठीचा वाटतो
तर कोणाला एकदम मोकळा ढाकअसा
वा कुणी त्याच्यावर
विलासी असल्याचा आक्षेप घेतो
तर कुणाला तो अत्यंत
कुटुंबवत्सल असा वाटतो .

तो कसाही असो पण
आपल्या पद्धतीने
आपले जीवन जगणारा असा आहे
आणि असे जगताना तो
कुणाचीही मुलाहिजा बाळगत नाही
एवढे मात्र खरे .
एका अर्थाने तो एक विलक्षण मित्र आहे .
तो हरहुन्नरी स्वभाव असलेला
जगाची जाण असलेला
जगाचे छक्केपंजे कळणारा
जगाशी छक्केपंजे खेळणारा
असा अवलिया माणूस आहे
मित्रांच्या भाषेत बोलायचे तर
एकदम अवली माणूस आहे .
या माणसाने जीवनात
खूप स्वप्न  पाहिली 
अन त्या स्वप्ना मागे तो झपाटून धावला.
यातील काही स्वप्ने यांनी पूर्ण केलीही,
काही अजूनही अपूर्ण आहेत
अन तो त्यांच्या मागे जाणे
कधीही सोडणार नाही
हे मला पक्के माहीत आहे.

या माणसाने जीवनात
अनेक दुःख सहन केले आहेत
अनेक पराभवही सहन केले आहेत.
पण या माणसाने कधीच
 हार मानली नाही
राखेतून उठणाऱ्या त्या
सुवर्ण पक्षासारखा
हा पुन्हा पुन्हा उठून उभा राहत आहे
फिनिक्स अाहे हा.

या माणसाचे आणखी एक वैशिष्ट आहे,
 ते म्हणजे त्यांच्यावर जर
अन्याय झाला असे त्याला वाटले
तर त्याविरुद्ध तो चवताळून उभा राहतो .
आणि मी मी म्हणणाऱ्यांशी सरळ पंगा घेतो
त्याची  मते म्हणजे जणू काही
दगडात कोरून काढलेले शिलालेख आहेत !
 एकदम पक्की!
 भले ती तुम्हाला पटोत वा ना पटोत
आवडोत अथवा न आवडोत
याच्याशी त्याला देणेघेणे नसते.
कारण ती तो कधीच बदलणार नसतो
 त्यामुळे तुम्हाला शेखरला
स्वीकारायचे असेल तर
त्याच्या माता सकट
स्वीकारले स्वीकारावे लागते.

 भले तर तुम्ही त्या मतांकडे
कानाडोळा करा
पण त्याला विरोध करू नका
कारण जर त्याला विरोध झाला
तर तो बंडखोर जागा होतो
आणि तुमच्याशी वाग युद्ध हे होणारच
वाद प्रतिवाद विवाद हे होणारच
त्या साठी कितीही वेळ लागो ,
अर्थात तो वाद संपल्यानंतर
त्याच्याशी असलेल्या मैत्रीला
कधीही तडा जाणार नाही
 याची मात्र सगळ्यांना खात्री असते .

तर असा हा अनेक खाचाखोचा असलेला
हरहुन्नरी मित्र आहे.
 त्याचा मनुष्य संग्रह प्रचंड आहे
त्यामुळे कधी कधी असे वाटते
हा मनुष्य म्हणजे स्वतःच एक संस्था आहे.
अशी संस्था जी कधीही निवृत्त होत नाही .
या माणसाला तुम्ही लाखवेळा सांगा
आता रिटायर होत आहेस
आराम कर
तो तसे कधीही आणि कदापि घडणार नाही
कारण जीवनामध्ये सतत
कार्यरत राहणे
या माणसाला त्याच्या जगण्याला
उर्जा देत राहणार आहेत.
ते त्याच्या जगण्याचे साधन आहे
असे मला वाटते म्हणून मी असे म्हणेल
की मित्रा तुझा हा अनिवृत्त प्रवास
असाच अव्याहत चालू राहू दे.
तू नवनवीन आव्हान घेत रहा.
त्यांना झेलत ,सतत लढत राहा
आणि विजयी होत राहा
 तुझ्यासाठी हि सदिच्छा .

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुकडा आयुष्याचा

तुकडा आयुष्याचा  ************* हा तुकडा आयुष्याचा  टेकला आभाळाला  अन्  धुरळा मातीचा प्रकाशाचा झोत झाला  जरी भाग्य मातीचे  सदा अस...