मंगळवार, २३ सप्टेंबर, २०१४

लग्न ...




लग्न का असत नाही
एक निखळ वैयक्तित निर्णय
आईबाप सगे सोयरे
यांनी गळ्यात बांधलेल्या
वांझ अपेक्षांच्या ओझ्या शिवाय
एक विमुक्त नाते
का जुळू शकत नाही इथे ?
मान्य आहे प्रत्येकाला
घर हवे असते
मुल हवे असते
समाजात प्रतिष्ठेने
जगायचे असते
पण म्हणून या दुनियेच्या
हजारो निकषांनी आणि
हजारो अपेक्षांनी   
वाकवलेल्या पाईपमधून
सरपटत जायलाच हवे का ?
लग्नाच्या बाजारात
प्रेमाच्या चिंधड्या होतात 
मनाची लत्करे उडतात
सारे सुंदर हसरे जग
भेसूर दिसू लागते
तरीही
गळ्यात टाय बांधून अन
भरजरी साडी नेसून
ते उभे राहतात त्या बाजारात
पुढे ते ही जगतात
संसार करतात
सुखी असल्याचे दाखवतात
पण गंधहीन फुलांचे ताटवे असतात
सारीच मनस्वी मिलन
यशस्वी होतात असे नाही
त्यांच्या जीवनात संघर्ष
नसतात असेही नाही
पण ते जगतात तेव्हा
ते आकाश त्यांचे असते
त्यांची दिशा त्यांचे फुलणे
त्यांनी ठरविलेले असते
ते जगणे सुगंधी असते

विक्रांत प्रभाकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मारूत

मारुत ******  एक रुद्र हुंकार  भेदत जातो सप्त पर्वत  पृथ्वी आप तेज वायू  सारे आकाश व्यापत  थरथरते धरती ढवळतो सागर  उ...