सोमवार, २६ जुलै, २०२१

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता .

अमृतानुभव भावअनुवाद लिहून झाल्यावर सुचलेली कविता  .
*****



आषाढी एकादशीला
संपूर्ण हा झाला 
अभ्यास चालला 
लिहूनिया॥१

योगायोग बरा
जुळून हा आला 
तेणे या मनाला 
तोष झाला ॥२

काय किती कळले
आत उतरले  
जरी न उमजले 
मज लागी ॥३

परी झाली सोबत 
ज्ञानदेवा संगत 
शब्दांशी खेळत 
अनायसे ॥४

येणे सुखावलो 
भुके व्याकुळलो 
दारी मी पातलो 
मावूलीच्या ॥५

पांडुरंगा दत्ता 
विक्रांत हा चित्ता
स्वरुपात आता
वास करो  ॥

🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ 



)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुटू द्यावे

सुटू द्यावे ******* असते सदैव साथ का कुणाची  सुटतात हात सुटू द्यावे ॥ खेळ जीवनाचा पहायचा किती  मिटतात डोळे मिटू द्यावे ॥ हातात न...