शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९

कधी येईल




कधी येईल हृदयी
दत्त माझा गिरनारी
कधी नेल मला
सवे प्रभू गिरनारी

कधी हरेल भवाचे
घर बांधले माचे
काही नसल्या भ्रमाचे
होता दर्शन रवीचे

कधी सरेल हा टाहो
असा माझ्या रातला
कधी पेटेल रे दिवा
न मंदिरा मधला

बापा करी रे करुणा
हाक पडू दे रे काना
दास म्हणवितो तुझा
नच ठरावी वल्गना

बघ सरला प्रकाश
दिस आला मावळती
येयेई जगजेठी
दाटे अंधार भोवती

घाली तुजला हाकारे 
दाटे पाणी डोळीया
वाट पाहून शिणला
होई उदास विक्रांत

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

एवढेच पुरे

एवढेच पुरे  ******** वेदनांची स्मृती म्हणजे असते भय  आनंदाचे स्मृती म्हणजे असते आकांक्षा  आणि ही दिसणारी अस्वस्थता  भय आणि इच्छे...