बुधवार, ११ जून, २०१४

वट पौर्णिमेला





प्रत्येक वट पौर्णिमेला मला
न चुकता फसलेला यम आठवतो
बायका किती वस्ताद असतात
मी मनात अधोरेखीत करतो
पुन्हा संसारात आणलेल्या
सत्यवानाची कीव करतो
भोग बाबा आता आपल्या
कर्माची फळ, मनात म्हणतो .
सात पावलात अडखळलेले
ते हजार संसार आठवतो  
वडाचे तुकडे घेवून जाणाऱ्या,
सुत गुंडाळणाऱ्या बायकांना मानतो   
जणू अट्टाहासाने स्वत:साठीच  
केलेली जाहिरात मी पाहतो   
किती केविलवाण्या असतात
काही प्रथा का आपण पाळतो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...