गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

विसरलीस तू


विसरलीस तू 
*************

विसरलीस तू  मला 
पण हरकत नाही.
शेवटी जीवन म्हणजे 
तरी काय असते
आनंदाने जगणे असते
कुणाच्या विरहात जगण्यापेक्षा
कुणाच्या सहवासात जगणे 
अधिक सुंदर असते.

कोण अधिक हुशार
कोण अधिक  रुबाबदार 
याला काही अर्थ नसतो.
हातातला गुलाबच 
सर्वात सुगंधी असतो.

रडूबिडू नकोस कधी
हास आपल्या वेडेपणाला 
आठवण आली जर कधी
बघ नक्की जमेल तुला

कालचा दिवस छान होता 
तर मग आजचा पण आहे 
काल जीवलग साथ होते
तसेच तर आजही आहे 

सखे बदलतात सोबती बदलतात 
शब्द बदलतात स्पर्श बदलतात 
पण अंतरात उमटणार्‍या 
भाव अन संवेदना तर त्याच असतात .

त्या उमलणार्‍या क्षणाशी
त्या खळाळत्या भावनाशी
 प्रामणिक  राहणे म्हणजेच तर
जगणे असते .


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘ 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोभ

लोभ ****** फुटली उकळी  गाणे आले गळा  प्रेमे उजळला  गाभारा हा ॥ १ शब्द सुमनांनी  भरले ताटवे भ्रमराचे थवे  भावरूपी ॥ २ पसरला धूप  ...