रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

सरे लाघव


सरे लाघव सजले 
मरे आर्जव दाटले 
हत वेड्या होते का रे
नाते अंतरी विणले 

सारे सुखाचे सोहळे
पीक मोसमी काढले
मग राहू दे रे रान 
ऊन खात हे जळले

होता पाऊस खरा नी
पीक दवात भिजले 
हिरव्या पानांचे सुख 
रानी बहरून आले

हे तो असेच घडते 
पीक मुडात भरते
बुजगावणे बाहुले
काळया मातीत पडते 

याद कशाला ती आता 
पाण्यातल्या पावूलांची 
प्रतिबिंब जपणाऱ्या
खोल भरल्या डोहाची

 ऋतू नित्यचि हा येतो
गाणे जीवनाचे गातो 
गाणे सरता नभात
पुन्हा हरवुन जातो 

तुझे तृणाचे डोलणे
ठेव मातीत पुरून
जन्म येईल रे नवा 
तेव्हा पुन्हा ये फुलून 


🌾🌾🌾

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘ .






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भक्ताचिया गोष्टी

भक्ताचिया गोष्टी ************** भक्ताचिया गोष्टी डोळा आणी पूर  भावनांनी उर भरू येई ॥१  आहाहा किती रे भाग्याचे पाईक  पातले जे सुख...