शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०१६

ध्यान







लोक कवितेचे विडंबन करतात मी  रूपांतरण केले आहे मूळ कविचे नाव मला माहित नाही कळले तर आनंद होईल .
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
***************************************
बसून थोडे गुंगणार असु
तरच ध्यानाला अर्थ आहे
एवढे बसून रंगणार नसु
तर आख्खा तास व्यर्थ आहे


मी तसा श्रध्दावान
श्रावण नेहमी पाळतो
श्रावणात उपवास करतो
अन कांदा लसूण टाळतो


ज्याची जागा त्याला द्यावी
भलती चूक करू नये
ध्याना फक्त पहात रहावं
स्वप्न रंग त्यात भरू नये


वेळच्या वेळी ओळखावी
आपली आपण जिंदगानी
लाज सगळी सोडुन देऊन
म्हणत बसावी देव गाणी


बसून धुंद झाल्यानंतर
काय करतो ते कळत नाही
काळवेळ अन तासामधली
टोटल कधी जुळत नाही


आपला मार्ग आपण सांभाळावा
दुसर्‍याला घेऊ देऊ नये
दुसर्‍याचा देव  उचलण्याची
वेळ आपल्यावर येऊ नये


अशीही वेळ असते जेंव्हा   
विश्वास आपला हरवतो
म्हणून आपण शोधाया जातो
तर नेमका रस्ता तिथेही नसतो


आपला संग आपण करावा
दुसर्‍यावर विश्वास ठेवू नये
आपली माळ आपले आसन
दुसर्‍याच्या हातात देऊ नये


असं उगीच लोकांना वाटतं
की दुःख देवात बुडून जातं
दुःख असतं हलकं हलकं
नाम ध्यानात उडून जातं!


एकदा ध्यानात बसल्यानंतर
तुझं-माझं करू नये
तुझी काय, माझी काय
ईर्षा कधी करू नये


तुला जायचंच असेल तर निघून जा ,
भांडणासाठी भांडू नकोस
घ्यायचे नसेल तर नाम घेवू नको ,
पण देवास कधी सांडू नकोस


सगुण घ्यावी  निर्गुण घ्यावी
उपासना पण, सोडू नको
उंच मूर्ध्यनी उडण्यासाठी
इच्छा हवी उगा अडू नको!


प्रभू नाम कितीही घ्यावे
फार कधीच वाटत नाही
नेमी आपल्या चिकाटी हवी
आयुष्यभर जी घटत नाही       

         
ध्यान असतं आगळा उत्सव
त्याचे नाटक होऊ नये
ध्यानात तर आपण कधी
कर्ता मालक  होऊ नये


घरी बसून ध्यान करायचे
खूप सारे फायदे असतात
मठामधे नित्य पाळायचे
काटेकोर कायदे असतात


आम्ही कधीच ध्यानामधे
दुःख आमचं बुडवत नाही
ध्यान नेहमी शुध्दच ठेवतो
भेसळ आम्हाला आवडत नाही


हवा तितका बसतो आहे
कोण म्हणतंय ' का जातोय खोल ?'
माझ्या मित्रा, ये माझ्या सोबत
बसून अनुभव, नंतर बोल!


प्रत्येक संगातआपण बोलवावे
काही ' ' मानणारे मित्र
समूह ध्याना नंतर आपल्याला
चौकस प्रश्न  विचारणारे मित्र


भक्तीत मस्त त्यांनी  समाजाचा
कुठलाच कायदा पाळू नये
जेंव्हा, जिथे, जशी वाटेल
नामाचा या मोह टाळू नये

 
मंदिरी लागेल त्या घुसत असतो
कीर्तनी लागेल त्या गात असतो
तेव्हा माझी काळजी सदा
प्रभू प्रेमाने तो घेत असतो


काय होतंय, कुठे होतंय
काही केल्या वळत नाही
एकदातरी वेळ अशी येते
ध्यान ध्याता कळत नाही


प्रत्येकानंच आपला आपला
जसा घ्यायचा असतो श्वास
तसा प्रत्येकानं  आपला
सांभाळायचा असतो ध्यास...
*समस्त  ध्यान प्रेमी भक्त मित्रांना
परिवर्तीत करून,

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मारूत

मारुत ******  एक रुद्र हुंकार  भेदत जातो सप्त पर्वत  पृथ्वी आप तेज वायू  सारे आकाश व्यापत  थरथरते धरती ढवळतो सागर  उ...