शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

|| अक्कलकोट ||







चालली आरती
सळसळे वट
कृपेचा वर्षाव
देवाच्या दारात  
काय हवे तुज
विचारते ज्योत
मागता येईना
विसरलो खंत
मागितले प्रेम
तयाच्या नामाचे
ज्ञान भक्ती अन
वैराग्य ते साचे
फुटावे अंकूर
बुद्धीला भाग्याचे
पानांतून यावे
आशिष प्रेमाचे
आणि काय हवे
ओढाळ मनाला
परत बोलावी
तुझिया पदाला

विक्रांत प्रभाकर तिकोणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...