शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०१४

चुकलेल्या सुरांचं गाणं






माणसं जपायचं कसब
माझ्यात कधीच नव्हत
प्रवाहावर वाहणं माझं
उगाच जगण होतं
मी मित्र मिळवले नाही
मित्रांनी मला मिळवलं
काहींनी टिकवलं
काहींनी सोडून दिलं .
या सुटण्या धरण्याच्या खेळात
वाईट एकाच गोष्टीचं वाटतं
ज्यांना खरच
हृदयापासून जपायचं होतं
त्यांनाच मन दुखवत गेलं
मन असं का असतं
मनाला खरच काय हवं असतं
मला कधीच नाही कळलं
पण  चुकलेल्या सुरांचं
जीवन एक गाणं झालं

विक्रांत प्रभाकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मनशून्य

शून्य **** मनाच्या गाभारी प्रगटले शून्य  जन्म प्रश्नचिन्ह पांघरले ॥१ मोडले पडले इमले बांधले  स्वर्गावरी गेले स्वप्न वेडे ॥२ वात ...