सोमवार, १० नोव्हेंबर, २०१४

कविता अन मी






अभंग न येत मजला

न जमतात गझला

भावनांचा पूर येता

शब्द होतात पाचोळा



उमटे आकार काही

उंच उडुनी धुरळा

घडणार कसे काही

माहित नसे कुणाला



लागतो कधी कश्याने

घोर या वेड्या जीवाला

तळमळता मन हे   

शब्द येती सांत्वनाला



रुजतात भाव आत

ये अंकुर प्रतिभेला

जाती मुळ्या खोलवर

उसवत अंतराला



विक्रांत प्रभाकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...