गुरुवार, २४ मार्च, २०२२

कवितेचे कारण

कवितेचे कारण 
***********
जर मी लिहली प्रेम कविता 
ते म्हणतात 
प्रेमात पडलास की काय ?

जर मी लिहली भक्तिगीत 
ते म्हणतात 
साधू झालास की काय ?

जर मी लिहले देश धर्मावर 
ते म्हणतात 
कट्टर झालास की काय ?

कविता फक्त कविता असते
हे खराय त्यात
माणसाचे मन  उतरते !

जर मी प्रेमी नसेल 
भक्त नसेल 
तर कविता कशी लिहेल ! 

तर तुम्ही खुशाल समजा 
मी आज साधू झालो
मी आज प्रेमात पडलो

पण कवितेवरून 
कवितेचे कारण शोधणे
याहून हास्यास्पद काही नसते !


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझी नर्मदा परिक्रमा

माझी  नर्मदा परिक्रमा  ***************** दिनांक 8 फेब्रुवारी 26 ते 27 जून 26 अशी 140 दिवसांची  परिक्रमा नर्मदा मैयेने पूर्ण करून...