गुरुवार, २४ मार्च, २०२२

कवितेचे कारण

कवितेचे कारण 
***********
जर मी लिहली प्रेम कविता 
ते म्हणतात 
प्रेमात पडलास की काय ?

जर मी लिहली भक्तिगीत 
ते म्हणतात 
साधू झालास की काय ?

जर मी लिहले देश धर्मावर 
ते म्हणतात 
कट्टर झालास की काय ?

कविता फक्त कविता असते
हे खराय त्यात
माणसाचे मन  उतरते !

जर मी प्रेमी नसेल 
भक्त नसेल 
तर कविता कशी लिहेल ! 

तर तुम्ही खुशाल समजा 
मी आज साधू झालो
मी आज प्रेमात पडलो

पण कवितेवरून 
कवितेचे कारण शोधणे
याहून हास्यास्पद काही नसते !


🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
☘☘☘☘☘☘.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धुनी

धुनी ***** माय नर्मदा प्रवाही गेला ओंडका वाहत किती पार केली गावे किती ओलांडले घाट  जल गेले हरपून  नील रत्न सागरात परी राहिला ओंड...