शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

हलकेच हात सोडवत



हलकेच हात सोडवत
म्हटली ती जेव्हा
आपण फक्त
मित्र आहोत ना ?
कसमुसा हसलो मी
आणि म्हणालो
अर्थातच !
एक वादळली कविता तेव्हा
कोसळली माझ्या आत
मग जे उरले होते
ते कोऱ्या पानाचे
फडफडणे होते
म्हटले तर आता
लिहायचे कारण नव्हते
म्हटले तर लिहायला
खूप काही होते .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपा कल्लोळ

कृपा कल्लोळ  ******* काय माझी गती अन् काय मती  तुज दयानिधी भेटू शके काय माझी श्रद्धा काय ते साधन  तुज बोलावून घेऊ शके  अवघा देहा...