गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

नाम नाव



किती किती पाणी देवा
किती किती ही निळाई
इवलासा जन्म माझा
सांग कैसा पार होई

कैसे भेटी येवू तुवा
कैसे तव प्रेम पावू
गळुनिया गेले बळ   
सांग कैसा पुढे जावू

सांगतात संत सारे
नाम नाव पार नेई
घेवुनिया थकलो मी
खरे वाटतच नाही

थांबतो मी इथे आता
जन्म मरणाच्या रणी  
प्रेम तुझे मनी माझ्या
ठेव किंवा जा घेवूनी  

जाणतो न विक्रांत हे
येणे जाणे तुझे काही
नाकारणे पण तुला
काही केल्या होत नाही

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भक्ताचिया गोष्टी

भक्ताचिया गोष्टी ************** भक्ताचिया गोष्टी डोळा आणी पूर  भावनांनी उर भरू येई ॥१  आहाहा किती रे भाग्याचे पाईक  पातले जे सुख...