बैल.
****
कुठे जातात ते गोऱ्हे आणि बैल कालवाडी सोबत जन्मा आलेले
गाई सोबत वाढलेले .
कधी खच्ची केलेले
कधी मोकाट सोडलेले
आम्हाला दिसतात
हजारो गाईंनी भरलेले गोठे
ज्या देत असतात दूध
कित्येक लीटर
oxytocin इंजेक्शन घेत
पण ती शेतात राबणारे
लाकडी गाड्या ओढणारे
बैल कुठे दिसत नाहीत .
सिलेक्टिव्ह गाईचे प्रजनन करणारे
संशोधन येथे झाले आहे का इथे?
किंवा ते जन्माला आलेले गोऱ्हे
पाठवले जातात मृत्यूच्या गावात
जन्माला येतात त्वरीत
किंवा दुर्लक्षित करून
उपाशी मारून
कुपोषित करून .
आणि आम्ही गोपालाचे स्मरण करत .
आनंदाने सेवन करतो
गोकुळ कृष्णा नंद इत्यादी
नावाने सजवलेल्या पिशव्यातील दुध
त्या गायीच्या रक्ताचा शेवटचा थेंब
दुधात परिवर्तन होईस्तोवर
काढलेले ते दूध
ते दुध.
त्या संपलेल्या गोऱ्हाच्या वाटणीचे .
आता गावोगावी दिसतात
ते धूर ओकणारे गरगर फिरणारे ट्रॅक्टर
जे क्षणात नांगरून देतात शेत
आणि सुटा करून देतात
मातीचा कण आणि कण
आणि ओढून नेतात
शेकडो किलोचे ओझे विनासायास .
त्यामुळे
हजारो वर्ष तुम्हा आम्हाला पोसणारे
ते बैलं आता केवळ उरणार आहेत
गाईला जन्म देणाऱ्या बीजाची बँक
तुमची आमची दुधाची तृष्णा संपत नाही तोवर.
आणि उद्या काही कारणाने
माणसातील नराची गरज अशीच संपली तर?
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा