रविवार, २५ डिसेंबर, २०२२

पुराणातील काळ मींमासा

पुराणातील काळ मींमासा
*******************:
आणखी 1 लहानपणापासून मनात येणारी शंका. हरितालिकेच्या कहाणीत उल्लेख आहे की पार्वतीमातेने भगवान शंकरांसाठी 
64,000 वर्षे तप केलै. लहानपणी शंका यायची की इतकी वर्ष कशी? का तेव्हाचा life span आतापेक्षा जास्ती होते? 🙏🙏

उत्तर

ही गोष्ट किंवा इतर अनेक पौराणिक कथा आहेत ज्यामध्ये तो राजा काही हजार वर्ष राज्य करतो असे लिहिलेले आहे .उदा.कार्तविर्य राजा वगैरे.  सदर कथा ज्ञानी मुनी किंवा ऋषींनी लिहिलेल्या आहेत असे मानले तरी ते इतकी वर्ष का लिहतात ते कळायला मार्ग नाही आणि आपल्या हिशोबाने हि वर्ष म्हणजे काहीच्या काहीच वाटतात तर मग हे लिहिणारे एक प्रकारचे स्वप्नरंजन तर करत नाहीत ? किंवा कुठलीही गोष्ट अंडरलाईन करायची असेल किंवा बोल्र्ड करायची असेल किंवा ती ठसवायची असेल तर तिला मुद्दाम चढवून वाढवून सांगितले जाते .ती पद्धत तर वापरली जात नाही  ना असे वाटते 

जे कोणी चार युगांची हिंदू धर्मातील धारणा मान्य करतात त्यांना तर माहीत असेल सत्य युगामध्ये मनुष्याचे आयुष्य एक लाख वर्ष होते. त्रेता युगामध्ये मनुष्याच्या आयुष्य दहा हजार वर्षे होते द्वापार युगामध्ये मनुष्य हजार वर्षे जगायचा आणि कलियुगामध्ये माणसाच्या आयुष्य फक्त शंभर वर्ष आहे.आणि शिवपार्वती हे तर सत्य युगाच्या ही अगोदरचे आहेत त्यामुळे ६४००० वर्ष हा कालावधी तसा लहान असावा .आणि  अमरत्वा पुढे ६४०००  म्हणजे तर किती लहान आकडा आहे

वैज्ञानिक आधार शोधायला गेलो तर. . 
 जयंत नारळीकर यांच्या कथा ज्यांनी वाचल्या असतील त्यांना डायमेन्शनची थेअरी माहीत असेल मराठीत डायमेन्शनला मिती असे म्हणतात त्या थेअरी प्रमाणे एकाच ठिकाणी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या मिति अस्तित्वात असू शकतात परंतु त्या एका मितितून दुसऱ्या मितिमध्ये प्रवेश करणे साधारणपणे शक्य नसते  (परंतु काही विशेष लोकांना काही विशिष्ट द्वारामधून किंवा वार्म होल मधून मिति  क्रॉस करायची परवानगी असावी..)त्यामुळे असे अनेक विश्व या पृथ्वीतलावर अस्तित्वात असणे शक्य आहे. तर प्रत्येक डायमेन्शन मधील काळ हे परिमाण वेगळं असू शकतं किंवा असावे ..त्याचे स्पष्ट उदाहरण श्रीकृष्णाचे बंधू बलराम आणि त्याची पत्नी रेवती यांच्या विवाहाला लागू होते रेवतीचा पिता रेवतीला घेऊन ब्रह्मदेवाकडे  योग्य वराची चौकशी करायला  गेला होता परंतु तेथे तो काही काळ थांबल्यामुळे तेवढ्या कालावधीमध्ये पृथ्वीवरील शेकडो वर्ष उलटून गेले होते व त्यामुळे त्या काळातील एकही वर रेवतीसाठी जिवंत राहिला नव्हता. ब्रह्मदेवाने तिच्या पित्याला पृथ्वीवर परत पाठवले व बलराम सध्या तिच्या साठी सर्वोत्तम वर आहे असे सांगितले.


या थेअरी वरील कालगणनेला पाठिंबा देतात या कालगणनेच समर्थन करतात . 
अन्यथा हे
मनावर ठसवण्यासाठी वाढवलेली वर्ष.असे मानणेआणि आपल्याला हवा तो चांगला त्यातील अर्थ काढणे हे ही ठिक.

डॉ.विक्रांत तिकोणे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भक्ताचिया गोष्टी

भक्ताचिया गोष्टी ************** भक्ताचिया गोष्टी डोळा आणी पूर  भावनांनी उर भरू येई ॥१  आहाहा किती रे भाग्याचे पाईक  पातले जे सुख...