शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

कुणासाठी





कुणासाठी मनामध्ये
एक वादळ उठले
अवसेच्या मध्यरात्री
एकटेच उधाणले

विझलेल्या गात्रामध्ये
विसरले गीत होते
थिजलेल्या मनामध्ये
गोठलेले स्वप्न होते

कुठून ते आसावले
आर्त सूर तिचे आले 
दुभंगले मन माझे
प्रकाशाच्या स्पर्शी न्हाले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बीज

बीज **** मी घेवून चार बीजे आलो माळरानावर  दूरवरच्या देशावर खरेच ते रखरखीत होते  आणि पाहिले डोकावून तिथल्या दऱ्या खोऱ्या  तर त्या...