शनिवार, २८ सप्टेंबर, २०१३

घरे पडतात



घरे पडतात
माणसे मरतात
घर पडे पर्यंत
माणसे त्याच
घरात राहतात
आपल्याच निवाऱ्यात
दफन होतात
नवीन चांगल्या
सुरक्षित घरात
राहायला कुणाला
नाही आवडत
पण जेव्हा हे
शक्य नसत
आपला जीव
धरून मुठीत
तिथेच त्यांना
रहाव लागत
हवाला ठेवून
देवावर नशिबावर
कारण तस म्हटले तर
आभाळाचे छत
केव्हाही पडू शकत

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पायवाट

पायवाट ****** हळूहळू मनात धूसर होणारी तुझी प्रतिमा  आणि शब्दांना लागलेली ओहोटी  याच्यातील सरळ संबंध नाकारत नाही मी  प्रत्येक खेळ...