सोमवार, १६ सप्टेंबर, २०१३

मृत्यू !

मृत्यू !
तसा म्हटला तर
पूर्णविराम असतो
साऱ्या कर्तृत्वाचा 
ऐश्वर्याचा माझेपणाचा
दारिद्रयाचा शोकाचा
आणि यातनेचा
खरतर तो कुणालाच
नको असतो
राजाला दारिद्र्याला
आजाऱ्याला भिकाऱ्याला
त्याला तिला तुला मला
जरी माहित असते
त्याची अटळता
कदाचित म्हणूनच
त्याची आठवण टाळत
असतो आपण जगत
आयुष्य भोगत
सतत अधाश्यागत
आणि होताच दर्शन
चुकून जरी त्याचे
नात्यामध्ये मित्रांमध्ये
शेजारी वा रस्त्यामध्ये
झटपट सारे
सोपस्कर उरकत
शक्य असेल तर
दुर्लक्ष करत
जाऊन बसतो
त्याच विस्मृतीच्या
आश्वस्त कोषात
पण...
आपल्या जाणीवेची
एक किनार
कितीही दडपली तरीही
असते सदैव फडफडत
क्षणा क्षणाचा
हिशोब सांगत
आणि आपण असतो
निरुद्देश धावत 
मृत्यू आपल्याला
गाठे पर्यंत .

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीपाद सखी

श्रीपाद सखी *********** स्वप्न हरखले डोळीया मधले  स्वप्नास लंघुनी स्वप्न हे उरले ॥१ नभात लक्ष दीप उजळले  अन चांदण्याचे तोरण जाहल...