बुधवार, १८ मे, २०२२

श्री जी चे प्रवचन सार दिवस १

श्री जी चे प्रवचन सार 
*********†*****

ठाणे येथे ज्ञानेश्‍वर मंदिरात निवृतीनाथ सभागृहांमध्ये श्री ज्ञानराज माणिक प्रभू यांची भगवद्गीतेवर प्रवचन चालू आहेत त्यातील पहिल्या प्रवचनाचे सार सहज आठवेल तसे देत आहे.
***

भगवद्गीता हीच ही एकंदर तीन भागात वाटली गेली आहे पहिला भाग एक ते सहा अध्याय कर्मयोग सहा 7ते 13अध्याय भक्तियोग 14 ते 18 ध्यान ध्यान योग किंवा प्रॅक्टिकल.
अर्थात हे विभाग (ग्राॉसली) स्थुळ आहेत .

त्यापैकी सोळाव्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती त्याचे विश्लेषण भगवान करत आहेत 
याआधीचे म्हणजे 14 ,15 यामध्ये भगवंतांनी वर्णन केलेले आहे ,ते म्हणजे मीच सर्वकाही आहे आणि माझ्या पर्यंत पोहोचल्यावर  कुणी हि मागे परत येत नाही . या अर्थाने ज्ञान  सांगीतले आहे

भगवंतांनी पहिल्या चार लोकांमध्येच 27 दैवी गुण कोणते ते वर्णन केले आहे बाकी उरलेल्या चोवीस श्लोकांमध्ये आसुरी आणि राक्षसी गुणांचे वर्णन केले आहे

राक्षस कोण तर जे द्वेष करतात ते .हे राक्षस धर्माचा, गुणी लोकांचा, देशाचा,  यशाचा द्वेष करतात.
आणि जे सदैव शरीर मग्न असतात ते असूर त्यांना दैवी गुण तर आवडतच नाही त्यांना फक्त खावो-पिवो मजा करो हेच आवडते
हेच   त्यांच्या जीवनाचा सूत्र असते त्यापलीकडे जीवन जगणे आहे यावर तुमचा विश्वास सुद्धा नसतो

पहिला दैवी गुण अभय(१). 
अभय असणे आणि निर्भय असणे यात फरक आहे  गुंड दरोडेखोर हे सुद्धा निर्भय असतात पण पोलिसांना पकडल्यावर ते शिक्षेला सामोरे जातांना त्यांच्यातील भय उघड होतं 
अंतरात  ते भयभीत असतात. त्यांचे  भय दाबण्यात आलेलं असतं .अभय खरोखर सर्वकाळी सर्व देशी सर्वत्र समान असते. मनामध्ये अभय निर्माण होण्यासाठी भक्ती आणि विवेक असावे लागतात दोन गोष्टीच अभय निर्माण करतात जगात प्रत्येक गोष्टीला भय असते उदा. चोराला राजाची किर्तीला अपयशाची भीती असते इत्यादी
दुसऱ्या गुण (२)आहे सत्व संशुद्धी  सत्व म्हणजे अंतकरण .अंतकरणाची शुद्धी 
सं शोधन म्हणजे संपूर्ण मुळातून सर्वथा .
अंतकरणाचे मन बुद्धी चित्त इत्यादी 4 भाग असतात अंतकरण चतुष्टय असे त्यास म्हणतात 
सर्वांची शुद्धी होणे फार महत्त्वाचे आहे

तिसरा गुण(३) आहे ज्ञानयोग व्यवस्थिति म्हणजे ज्ञान योगात स्थिर होणे. महाराज याला ट्रेनमधून खाली उतरल्यावर ते पाच मिनिटांसाठी इडली वडा खाण्याचे उदाहरण देतात म्हणजे प्रत्येक क्षणी प्रत्येक मिनिटाला आपल्या मध्ये ज्ञान मिळवायचे ओढ जागी राहिली पाहिजे लक्ष  ज्ञानाकडे असले पाहिजे

चौथा (४)गुण दानाचा आहे दानाला आपल्या धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे दाना मुळे आपली आसक्ती कमी होते. आपल्याला मरताना सगळं सोडून जायचं आहे त्यामुळे सोडायची सवय लागणं  महत्वाचे आहे अन्यथा लोभग्रस्त होऊन मन आपल्या वस्तू मध्येच अडकून पडते. दानाचे महत्व यासाठी आहे की त्यामुळे आपण केलेल्या पापाचे परिमार्जन सुद्धा होते.
पाच(५) गुण हा दम, दमन आहे याचा अर्थ आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवणे .इंद्रिय ही सदैव बहिर्गामी असतात डोळे रूपासाठी जीभ चवीसाठी त्वच्या स्पर्शासाठी आसक्त असते  त्याना तिथून फिरवून मनामध्ये स्थिर करायचे असते. असे आतमध्ये वळवायचे  कर्म  तेच दम
यज्ञ हा सहावा ६ गुण  आहे आपण जे काही करतो ते देवासाठी करणे आत्म्यासाठी करणे याचं नाव यज्ञ 
जेवणाआधी देवाचे नाव घेणे प्रार्थना करणे हा यज्ञ आहे पूजा प्रार्थना हे देवाचे आभार मानण्याचे साधन आहे थँक्स गिविंग आहे काही मागण्यासाठी पूजा-प्रार्थना नसते.हे सारे यज्ञ आहे

या पुढचा गुण (७) आहे तो म्हणजे स्वाध्याय. स्वाध्यायचे दोन अर्थ आहेत स्वत:चा अध्याय स्वतःचा अभ्यास. आपण दिवसभर काय केले कसे वागलो किती पुण्य केले किती पापे केली किती देवाजवळ होतो किती दूर होतो त्याचे निरीक्षण करणे. याशिवाय संतांचे वचन ग्रंथ गीता ज्ञानेश्वरी वाचणे हे सुद्धा स्वाध्याय आहे ..
पुढचा गुण (८)आहेत तप म्हणजे तपणे, तापवणे स्वच्छेने शरीराला कष्ट देणे कारण मरणाच्या वेळेला देहाला अनंत स्पष्ट होतात अनेक व्याधी आधी ग्रासून टाकतात त्यावेळेला मन त्यात गुंतून जाते आणि देवाचे स्मरण होत नाही म्हणून या देहाच्या कष्टांना सवय म्हणून आणि कष्टा मध्ये सुद्धा ती देवाकडे लागलेली असणे याची ही तयारी आहे किंवा शिक्षा पद्धती आहे असे म्हणता येईल. त्यापुढचा गुण (९)आहे तो म्हणजे आर्जव .आर्जव म्हणजे ऋजुता सोफ्टनेस बोलताना वागताना येणारी नम्रता.सरळता होय.

श्री ज्ञानराज माणिक प्रभू महाराज.प्रवचनातून 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोभ

लोभ ****** फुटली उकळी  गाणे आले गळा  प्रेमे उजळला  गाभारा हा ॥ १ शब्द सुमनांनी  भरले ताटवे भ्रमराचे थवे  भावरूपी ॥ २ पसरला धूप  ...