गुरुवार, १९ मे, २०२२

श्री जींच्या प्रवचनाचा दुसरा दिवस श्लोक 16.2 व 16.3


श्री जींच्या प्रवचनाचा दुसरा दिवस श्लोक 16.2 व  16.3
काल आठवतांना एक पहिला मुद्दा मी विसरून गेलो होतो त्यावेळी  श्रीजी सांगत होते की संपत्ती म्हणजे काय ?
हा अध्याय दैवी संपत्ती असुरी संपत्ती अन राक्षस संपत्ती त्यावर आधारलेला आहे. तर संपत्ती म्हणजे काय श्रीजी म्हणतात संपत्ती म्हणजे तुमच्या कडे असलेले सगळं काही धन दौलत पैसाअडका स्थावर जंगम व्यवहारांमधील संपत्ती असते परंतु अध्यात्मिक जगामध्ये संपत्ती ही वेगळी असते आणि ती संपत्ती म्हणजे दैवी गुण असतात.
 संपत्तीच्या मोबदल्यात आपण काहीतरी घेत असतो देत असतो म्हणजेच संपत्तीची अशी व्याख्या करता येते की जी वस्तू देऊन आपण काहीतरी घेऊ शकतो. तर ही दैवी संपत्ती अशी आहे ती देऊन आपण   मोक्ष मिळू शकतो. तर  ज्याला मोक्ष हवा मुक्ती हवी त्याला दैवी संपत्ती प्राप्त केल्याशिवाय पर्याय नाही.


आज श्री जी सांगत होते  दैवी गुणा बद्दल
 १० वा अहिंसा हा  दैवी गुण आहे अहिंसेचा अर्थ विशद करताना ते म्हणतात अहिंसा हा परम धर्म आहे हे खरंच परंतु त्याच्या पुढील जे वाक्य आहे हे बहुतेकांना माहिती नाही ते म्हणजे धर्मासाठी केलेली हिंसा हाही धर्मच असतो. भगवान कृष्णाने घडवून आणलेली हिंसा, कुरुक्षेत्र युद्ध ही धर्मासाठी होती म्हणून ती परमधर्मा मध्येच मोडते त्याचप्रमाणे देश, धर्म, देवासाठी केलेली हिंसा ही धर्मा मध्येच मोडली गेली पाहिजे .अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध केली गेली हिंसा हि अहिंसाच असते.

हिंसा तीन प्रकारचे असते कायिक वाचिक आणि मानसीक
 देहाने कुणाला न दुखावणे त्रास न देणे इजा न पोहोचणे मनाने कोणाबद्दल वाईट न चिंतने वाईट न बोलणे अपयश न चिंतने  हे मानसीक तर वाचिक अहिंसा म्हणजे कुणाला वाईट वाटेल असे न बोलणे कर्कश्य न बोलणे अपमानास्पद न बोलणे इत्यादी.

11 अकरावी दैवी संपत्ती किंवा गुण हा सत्य आहे सत्य बोलावे रुजू बोलावे कुणाला न दुखेल असे बोलावे. सर्व आचरण हे सत्याला धरून असावे .मनात एक आणि बाहेर एक असे न वागणे असते. तसेच सत्य भाषण सुद्धा दुसऱ्याला दुःखदायी होणार असेल तर न बोललेलेच बरे.

12. बारावी दैवी संपत्ती किंवा कोण हा अक्रोध आहे अक्रोध म्हणजे शब्दात सांगायचं तर न रागावणे. पुन्हा अक्रोधा सुद्धा श्री जी म्हणतात की भगवान श्रीकृष्णाला सुद्धा क्रोध आला होता त्यांनी क्रोध केला होता उदाहरणार्थ शिशुपालास 99 प्राप्त होईपर्यंत त्यांनी अक्रोध जपला होता परंतु शंभर वा अपराध केल्यावरती त्यांनी त्याचा वध केला होता तसेच रणांगणामध्ये आपले भक्त आणि जिवलग मित्र अन सैन्य भीष्मा कडून पराभूत होत  मारले जात आहेत हे पाहून क्रोधाने रथाचे चाक घेऊन ते भीष्मावर धावून गेले होते. याचा अर्थ क्रोध हा अस्वाभाविक नसतो परंतु तो सत्वागुणाच्या आधाराने उभा राहिला तर तेजाला साहाय्यक होतो.

तसेच श्री सांगतात की क्रोध हा अवलंबून असतो तो एकटा कधीच नसतो क्रोधाच्या अगोदर काम हा असतो कुठलीही कामना पूर्ण होत नाही तिला अडथळा येतो त्या वेळीच क्रोध उभा राहतो.

13 तेरावा गुण हा त्याग आहे . हा गुण समजावताना श्रीजी सांगतात की ज्या वेळेला गरुड आपल्या चोचीमध्ये मांसाचा तुकडा घेऊन फिरत असतो त्या वेळेला त्याच्या पाठीमागे खूप कावळे लागतात आणि त्याला बेजार करून सोडतात पण ज्या क्षणी तो मांसाच्या तुकड्याचा त्या करतो त्या क्षणी ते कावळे मांसाच्या तुकड्याकडे निघून जातात आणि गरुडाला सुख शांती मिळते.

14. 14 वा गुण शांती आहे..याचे वर्ण न मला आठवत नाही


15.  अपैशुनम हा पंधरावा गुण आहे पैशुनम् म्हणजे कोणाबद्दल तरी वाईट बोलणे चुगली चहाडी करणे.टिका करणे.
 चुगली करणे माणसांमध्ये हा फार मोठा दोष आहे ती ज्या वेळेला दोन व्यक्ती भेटतात त्यावेळेला बोलण्याच्या नादात ते तिसऱ्याची निंदा करतात ती  करतात त्यातून ते स्वतःलाच  पापाचे भागीदार बनवतात. ते  खिरीत गरुडाने पकडलेल्या सापाच्या मुखातील वीज पडून मेलेल्या ब्राह्मणाची गोष्ट सांगतात.अन ते पाप कोणाला असा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेला साप का गरुड का आचारी का राजा ही कोणीच पापाचे तसे जबाबदार नसतात. परंतु त्या घटनेची निंदा करणाऱ्या व्यक्तीला  या दहा ब्रह्महत्येचे पाप यमधर्म देऊन टाकतो. या गुणाचे महत्व  सांगण्यासाठी ही गोष्ट पुरेशी आहे.
16  दया  कुणाबद्दल सांगताना श्री सांगतात परमेश्वर दयाळू आहे म्हणजे काय आहे ज्या वेळेला तुम्हाला सर्व परिस्थिती अनुकूल असते हीच परमेश्वराची दया असते. दये बद्दल सांगता सांगता ते सांगून जातात कृपा म्हणजे काय तर परमेश्वर ज्या वेळेस तुम्हाला अनुकूल नसलेली परिस्थिती निर्माण करतो. दु:खद परिस्थिती निर्माण करतो की त्याची कृपा असते जेणेकरून त्यामधून तुमचे जमलेले पाप तो शोषून काढत असतो आणि तुम्हाला आपल्या जवळ येण्यासाठी मदत करत असतो.
दया हा गुण कसा असावा तर दया सर्व भूतान प्रति असावी केवळ आपली लोक आपले नातेवाईक त्यांच्या बाबतीतच दया उत्पन्न होऊ नये प्राणी जसे गाई कुत्रा मांजर इत्यादी सर्व प्रकारच्या पशु बद्दल पक्षांबद्दल मनात दया उपजयला हवी .भुतप्रेम ही दयेची अभिव्यक्ती आहे

17 अलोलुप्त्वं17 वा गुण किंवा दैवी संपत्ती आहे लोलुप्य म्हणजे एखादी गोष्ट अतिशय हवी असणे तिचा हव्यास वाटणे.त्या गोष्टीचे व्यसन लागणे

18. मार्दव भव्य म्हणजे सोफ्टनेस मृदुता कुणालाही न दुखावणे.

19ह्रिर म्हणजे.लज्जा . आपण करत असलेल्या कृत्याबद्दल जर, ते कृत्य योग्य नसेल त्याबद्दल लज्जा निर्माण होणे आणि त्यातूनच पश्चातापाची भावना उदय असणे हा दैवी गुण असा आहे. निर्लज्ज माणसे ही एक प्रकारे कठोर असतात आणि त्या कठोर तेथून ते योग्य निर्णय घेतात.

20 अचापलम म्हणजे अस्थिरता अन चंचलतेचा अभाव.
मनामध्ये उठलेले विचार विकार यांचे शरीरावर  प्रतिबिंब न उमटू देणे, स्थिर राहणे. किंबहुना  मनाचे छान चांच्यल वाढेल अशा गोष्टी न करणे.

21 तेज म्हणजे तेजस्विता. अन्याय आक्रमकता अत्याचार या विरुद्ध उभे राहण्याची शक्ती, गुण म्हणजे तेज होय. श्री जी नी याठिकाणी आपल्या देशावर होणाऱ्या आक्रमणाला दिलेल्या उत्तराची उपमा दिलेली आहे अगदी सार्थ आहे.
22. क्षमा या बद्दल बोलताना श्रीजी म्हणतात क्षमा ही त्याचीच असते कि ज्याला दंड करण्याचे सामर्थ्य असते .परंतु तो ते न करता त्या व्यक्तीला माफ करतो
दुबळा माणूस क्षमा करू शकत नाही ती क्षमा म्हणजे त्याचा नाईलाज असतो. तसेच क्षमे चे प्रकार सांगताना, ते मोहग्रस्त क्षमा हा प्रकार सांगतात मुला बद्दल वाटणारी बापाचे जो मोह असतो त्यामुळे तो मुलाचे अपराध पोटात घालून त्याला क्षमा करत असतो
23 धृती म्हणजे धैर्य श्री जी नी हा गुण फारसा विशद केला नाही पण धैर्य म्हणजे संकटामध्ये उभा राहण्यासाठी आवश्यक असलेला गुण आहे रणांगणातून पळ न काढणे, शत्रूला सामोरे जाणे अन्याया समोर उभा राहणे या सार्‍या गोष्टी धैर्यवान व्यक्तीच करू शकतो. त्याच पायावर तीच तेजाची इमारत उभी असते.
24 शौच म्हणजे स्वच्छता ही स्वच्छता सुद्धा देहाची मनाची आणि वाचेच्या असावी लागते. देहाची स्वच्छता आहे ती स्नानादी  गोष्टींनी होत असते. मनाची स्वच्छता मनात सद्गुणाचे संवर्धन करून होत असत। वाचेची स्वच्छता ही सत्य वचनाने मधुर भाषणाने होत असते
25 अद्रोहो  अहो म्हणजे मनात आपण समोरच्या व्यक्तीबद्दल जे वाईट विचार करतो ते होत. आपण समोर त्या व्यक्तीबद्दल तोंडावर चांगले बोलतो, गुणगौरव करतो पण मनी त्याचे वाईट चिंतेत असतो. त्याच्या वाईट झाले तर मनाला आनंदी होत असते, भले आपण त्याच्याबद्दल वाईट कृती करत नाही परंतु त्याच्याविरुद्ध वाईट कृती करायचे विचार आपल्या मनात अनेकदा येत असतात हे असे न घडणे यास  अद्रोह असे म्हणतात
26 सव्विसावा दैवी गुण म्हणजे न अति मान्यता स्वतःबद्दल कुठल्या प्रकारच्या मोठेपणाची आवड नसणे .आपण कोणीतरी मोठे आहोत अशी ग ची भाषा नसणे हे अमानीत्व, बऱ्याच वेळेला कुणाला अधिकार मिळतात, पदामुळे मिळालेले अधिकार, नशिबाने मिळालेले अधिकार पण हे त्या व्यक्तीला कळत नाही.की ते त्या पदाला खुर्चीला मिळालेले आदरातिथ्य मानसन्मान स्वतःचेच असे मानून घेतो .तर त्याबद्दल सावध राहणे व तो मान मान्यता आपले नाही हे ज्यांना कळते ते अमानित्व.

हे गुण दैवी संपत्ती जी जन्मला घेऊन आलेल्या मनुष्याची असतात.
*****
श्री.ज्ञानराज माणिक प्रभु महाराज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आरसा

आरसा ****** तुझिया डोळ्यांनी मीच मला पाहतो वादळ संवेदनांचे कणाकणात वाहतो  कविता तुझ्यावरच्या  लिहून खुश होतो  मी तुला खुश करतो क...