शुक्रवार, २० मे, २०२२

श्लोक १६.४ व १६.५ .श्री ज्ञानराज माणिक प्रभुजी महातराज गीता यज्ञ आधारीत.

श्लोक १६.४ व १६.५  .श्री ज्ञानराज माणिक प्रभुजी महातराज  गीता यज्ञ आधारीत.
*****************::
दैवी गुणांचे वर्णन केल्यानंतर आज श्री जी असुरी गुणा बद्दल सांगत आहेत .

आसुरी गुणांमधील पहिला गुण म्हणजे दंभ हा आहे 
दंभ म्हणजे आपण जे नाही ते दाखवणे आपल्यात नसलेल्या गुणाचे खोटे प्रदर्शन करणे किंवा ते आपल्याच आहे असे भासवणे . उदा. भित्र्या माणसाने आपण फार शूर आहोत असा आव आणणे.

दर्प म्हणजे ,मी फार कुठेतरी मोठा आहे असे भासवणे किंवा असे स्वतःलाच वाटणे .आपल्या जवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीचा गर्व वाटणे .उदा घर गाडी बंगला धन  इत्यादी. ममत्व हा दर्पाचा स्थायी भाव आहे 

अभिमान म्हणजे जे आपल्या मध्ये जे आहे ते मिरवणे त्याबद्दल अहंकार बाळगणे .  उदा .रूप  कला गुण जसे की गायन नृत्य वकृत्व इत्यादी.
हे सारे गुण देवाने दिलेले असतात .ते त्याचेच दैवी गुण असतात .ते आपले म्हणणे हे देवाला कसे अवडेल .अहंता दर्पाचा स्थायी भाव आहे .

अश्या रितीने जिथे अहंता ममता तिथे आसुरी गुण .

पारूष्य म्हणजे ताठा , कठोरता .
ताठा (अकड) असलेल्या व्यक्तीची तुलना श्री जी नी मेलेल्या व्यक्तीशी केली आहे .मरून पडलेल्या मुडद्याशी केली आहे .देह मेल्यावर ताठ होऊन जातो त्याप्रमाणे या ताठ माणसाची अवस्था असते 
अज्ञानाबद्दल ते सांगतात ,ज्ञान हे सापेक्ष असते कधीकधी वर पाहता जे ज्ञान असते तेच अज्ञान असते .जसे की अणू बॉम्बचा शोध लावलेले शास्त्रज्ञ ज्ञानी वाटतात परंतु ते ज्ञान माणसाच्या विनाशाला कारणीभूत होते ते अज्ञानच होय. कोरोना व्हायरसचा जंतू निर्मान करणारे ज्ञान हे अज्ञान तर कोरोनाव्हायरस ची लस शोधून काढणारे ज्ञान हे खरोखर ज्ञान होईल .

क्रोध म्हणजे रागावणे ,चिडणे. श्री जी इथे पुन्हा वर अक्रोध मध्ये उल्लेख केलेले क्रोधाचे वैशिष्ट सांगतात जसे की क्रोधा विनाकारण नसतो त्याला कारण लागतं .कामना फलद्रुप न होणे हे ते कारण असते तसेच क्रोध हा सर्व नाशाचे कारण आहे असेही ते .सांगतात .ते सांगतात रामायण का घडलं तर कैकयीच्या क्रोधामुळे कळलं तसेच रावणाच्या क्रोधामुळे घडले .
महाभारत का घडलं द्रौपदीच्या क्रोधामुळे घडलं दुर्योधनाच्या क्रोधामुळे घडलं तसेच भगवंताच्या क्रोधामुळे घडलं .

हि सारी दैवी संपति कशाला गोळा करायची आहे तर मोक्षा साठी.मोक्ष कुणाला हवा असतो . तर याच दैवीगुण युक्ताला .
सारे काहि असुनही या जन्ममृत्युच्या चक्रातून बाहेर पडायची इच्छा असते पुढचा जन्म कुठला असेल ते आपल्याला माहित नसते पुढच्या जन्मात कुठल्या दुःखातून जावे लागेल त्याची ही खात्री नसते शाश्वत सुखासाठी  आनंदासाठी प्रत्येकाला मोक्ष हवा असतो .
तर आसुरी शक्ती ही सदैव बंध निर्माण करते

 त्यामुळे भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना तू शोक करू नको कारण तू दैवी संपत्ती घेऊन जन्माला आलेला आहेस .
ज्याअर्थी अर्जुनच्या मनामध्ये करुणा  निर्माण झाली त्याअर्थी अर्जुना मध्ये दैवी गुण संपत्ती आहेच. परंतु समोर असलेल्या व्यक्ती ही आपली माणस आहेत आपली भाऊ काका मामा असे आहेत हे आपले पण ज्या क्षणी जन्मालआले तो मिश्र गुणी झाल. त्याच्यात असुरीगुण प्रादुर्भाव झाला त्यामुळे भगवंताला त्या गुणाला दूर करण्यासाठी ही गीता सांगावी लागली. पण मुळात तो दैवी पुन्हा युक्त होत।

आधारीत .
श्री ज्ञानराज माणिक प्रभुजी गीता यज्ञ



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी ********* मनावरी गोंदलेले नाव तुझे हळुवार सांग तुला दावू कशी प्रेम खूण अलवार ॥१ डोळ्यातील चांदण्यांना तुझ्या ...