सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

ओळीवरून कविता (माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही)








माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही
असे म्हणणे म्हणजे
मूर्खपणा बाकी काही नाही
सारेच मनासारखे कश्याला व्हायला हवे
निवडूंगावर गुलाब का यायला हवे
मी काय असे पुण्य केले
की टाटा बिर्लाच्या घरात डोळे उघडले 
आपण तगर आहोत ना मग वास नाही
म्हणून रडण्यात अर्थ नाही
आपण गरुड नाही म्हणून कधी   
चिमणी उडायचे सोडत नाही
ज्याला असते रडायचे
काम सोडून बसायचे
त्यालाच असतात बहाणे करायचे
रडणे भेकणे सोडून दे
दु:ख वाऱ्यावर सोडून दे
जसे आहे तसे जीवन
मिठीत घेवून जगून घे
शेवटी  हे ध्यानात ठेव
मनाप्रमाणे काहीच होत नाही
असे म्हणतो त्याच्या घरी
सकाळ कधीच होत नाही
जे तुला कधीच नको असते
किंवा नसल्याने काहीही
बिघडणार नसते
ते तुला कधीच मिळत नसते
प्राणातून उमटू दे आकांक्षा
मनातून नको
ती पूर्ण करण्यास
विश्वात्मा बांधील असतो
हे सनातन सत्य आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

॥श्री गणपती ॥

॥श्री गणपती ॥ 🌺🌺🌺🌺 मुलाधारी मूळ कामनांचे कुळ  साचलेले स्थुळ देहरूपी ॥१ दूर त्या सारावे निर्मळ मी व्हावे  म्हणूनही करावे साधन...