सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

मित्र भेटतात तेव्हा






दिस उजाडत नाही
रात्र ही सरत नाही
मित्र भेटतात तेव्हा
शब्दही थांबत नाही

स्मरणांचा धबधबा
कोसळतो अनावर
हसतांना बोलतांना
किती लोटती प्रहर

कधी लबाड होवून
हळू टपली मारतो
भांड भांडूनिया कधी  
मिठी प्रेमाने मारतो  

यश कीर्ती वय पद
सारे हरवून जातो
आपल्यातच आपण
कुणी दुसरेसे होतो  

काही नसते अपेक्षा
तरी भरते आकाश
उगा उगाच आपण
जातो होवून प्रकाश



विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

श्रीपाद सखी

श्रीपाद सखी *********** स्वप्न हरखले डोळीया मधले  स्वप्नास लंघुनी स्वप्न हे उरले ॥१ नभात लक्ष दीप उजळले  अन चांदण्याचे तोरण जाहल...