सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

मित्र भेटतात तेव्हा






दिस उजाडत नाही
रात्र ही सरत नाही
मित्र भेटतात तेव्हा
शब्दही थांबत नाही

स्मरणांचा धबधबा
कोसळतो अनावर
हसतांना बोलतांना
किती लोटती प्रहर

कधी लबाड होवून
हळू टपली मारतो
भांड भांडूनिया कधी  
मिठी प्रेमाने मारतो  

यश कीर्ती वय पद
सारे हरवून जातो
आपल्यातच आपण
कुणी दुसरेसे होतो  

काही नसते अपेक्षा
तरी भरते आकाश
उगा उगाच आपण
जातो होवून प्रकाश



विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अशोक कोकणे श्रद्धांजली

अशोक कोकणे श्रद्धांजली  *********** महाड मधील आमचे घरमालक कोकणे, भाई अन् ताई यांना असलेली पाच मुले, विजय दिलीप अशोक प्रदीप आणि र...