मंगळवार, २ जून, २०१५

तुझ्या दारी..





हे माझे उदास गाणे
तुझ्या दारी आले कधी
हाकलून त्यांना दूरवर
घालवू नकोस कधी
चोचभर पाणी दे
घासभर प्रेम दे

शेवटचे कडवे
लांबलेच जर कधी
कंटाळून तयास सोडून
जावू नकोस कधी
क्षणभर साथ दे
मनभर दाद दे

फार काही सांगत नाही
गळा ओळ घालत नाही  
तुझ्यासाठी लिहिले तरी
तुला मी मागत नाही
ओठावर हसू दे
पुसलेले आसू दे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...