शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४

माळवे (मनात राहणार व्यक्तिमत्व )




आवाज कुणाचा !!
कामगार एकजुटीचा विजय असो !!
ही वाक्य कानी आली की
मागे वळून पहायची गरजच नसे  
ते माळवेच असणार
यात मुळी शंकाच नसे .

धीरगंभीर चेहऱ्याने,आवाजाने
कामगारांचे नेतृत्व करणारा
त्यांचे प्रश्न मांडणारा
तर कधी कधी त्यांना
वडिलकीच्या नात्याने
उपदेशांचे डोस पाजणारा
खराखुरा कामगार नेता .

तरीही आपल्या कामात
कुठलीही कुचराई न करता
वरिष्ठांचा अपमान न करता
दोन्ही पक्ष सांभाळले त्यांनी
तारेवरची कसरत करता करता

आवाजात नम्रता आर्जव
आणि कळकळ असे त्यांच्या
निर्भीडपणा स्पष्टवक्तेपणा
आणि खास माळवी खर्ज
स्वरात उमटायचा न चुकता

त्यांनी केले एक स्थान
मनात आपल्या सर्वांच्या
खरतर इथे सत्काराहून
ठेचाच जास्त बसल्या त्यांना
स्वीकारले सारे त्यांनी
कुठलीही कटकट न करता
अन सतीचे वाण समजून
झेलली संकटे लढता लढता 

अश्या व्यक्ती दुर्मिळ असतात
सदैव आपल्या मनात राहतात
मनात ठेवायला त्यांना
मित्रही धन्यता मानतात

डॉ.विक्रांत प्रभाकर  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भक्ताचिया गोष्टी

भक्ताचिया गोष्टी ************** भक्ताचिया गोष्टी डोळा आणी पूर  भावनांनी उर भरू येई ॥१  आहाहा किती रे भाग्याचे पाईक  पातले जे सुख...