रविवार, ६ जुलै, २०१४

येईल कुणी तुझ्यासाठी








एक हात सुटला
म्हणून काय झालं
एक डाव मोडला
म्हणून काय झालं
तू प्रेम केलं होतं
प्रेमाचच भाग्य होतं
कुणीतरी तोडून गेलं
त्याचं नशीब खोटं होतं
कुणावरी प्रेम जडतं
वेड स्वप्न जागं होतं
तन मन मोहरून
कोसळणारं आकाश होतं
कुठेतरी काहीतरी पण
नकळे काय चुकत
वाऱ्यावर बांधलेलं
स्वप्न विरून जातं
तो गेला तरी पण
प्रेम मागंच उरतं
कारण काही झाल तरी
ते प्रेम आपलच असतं
आपलं प्रेम आपणच
सांभाळायचं असतं
तुटलं फुटलं वाटलं तरी  
सदैव अभंग असतं
प्रत्येक प्रेमाला लायक
कुणी तरी असतो
कधी लवकर कळतो
कधी उशिरा कळतो
जे हृदय प्रेम शोधतं
त्याला ते नक्की मिळत
तुझं प्रेम फक्त तू
कोंडून ठेवू नकोस
येईल कुणी तुझ्यासाठी
विश्वास हरवू नको

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपा कल्लोळ

कृपा कल्लोळ  ******* काय माझी गती अन् काय मती  तुज दयानिधी भेटू शके काय माझी श्रद्धा काय ते साधन  तुज बोलावून घेऊ शके  अवघा देहा...