शनिवार, ८ फेब्रुवारी, २०१४

हुजुरेगिरीत


 




हुजुरेगिरीत जर
वर्ष व्यतली असती
आमचीही इथे राज्यं
बहुत झाली असती
वदले ते निष्ठा इथे
संपूर्ण द्यावी लागते
सांगितले भले बुरे
सारे करावे लागते
मग्रुरी रक्तात परि
काही वेगळीच होती
अभिमानी मान कधी 
कुठे झुकली न होती
ती वाट पुन्हा कधीही
मग धरलीच नाही
कष्टण्यात वर्षं गेली 
खंत वाटलीच नाही
आता तर सुखाचीही
मज याद येत नाही
फकिरास कफनीचा
या मोहही इथे नाही
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भक्ताचिया गोष्टी

भक्ताचिया गोष्टी ************** भक्ताचिया गोष्टी डोळा आणी पूर  भावनांनी उर भरू येई ॥१  आहाहा किती रे भाग्याचे पाईक  पातले जे सुख...