शुक्रवार, १० मे, २०२४

एवढेच पुरे



एवढेच पुरे 
********
वेदनांची स्मृती म्हणजे असते भय 
आनंदाचे स्मृती म्हणजे असते आकांक्षा 
आणि ही दिसणारी अस्वस्थता 
भय आणि इच्छेची प्रतिमाच असते 
अरे खरच की 
तर मग काय करायचे कसे बाहेर पडायचे

अरे ही इच्छाच ! त्यातून सुटायची 
पुन्हा त्या चक्राची पुनरावृत्ती करते

असे हे लखलखीत सत्य 
डोळ्यासमोर ठाकते 
तेव्हा खोलवर दडलेले 
अंधाराचे ठसे विरघळू लागतात
 
म्हणून थांब इथेच !
हे जाणणे, हे पाहणे महत्त्वाचे 
पुढे काय घडणार कशाला पाहायचे 

त्यामुळें ते चक्र जन्म घेते
त्या चक्रात फिरणे घडते
म्हणून ते चक्र थांबणे महत्त्वाचे 

त्या स्तब्धतेत निरवतेत 
अस्तित्वात असणे तुर्त एवढेच पुरे 
पुढचे पुढे
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बाबा

प्रिय बाबासाहेब  *********** कृतज्ञतेच्या किनाऱ्यावर येवुन  तुम्हाला करतो आहे मी अभिवादन  कुठलाही रंग कुठलाही झेंडा  हातात घेतल्...