शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

राखी





म्हटलं तर दोराच
दोन गोंडे लावलेला
बेगडा मध्येच मणी
छानपैकी सजविला

समर्थ असा पण की
जीव जीवास देणारा
रक्तातल्या हुंकाराला
क्षणात साद देणारा

नव्या वर्षी नवी गाठ
नवा धागा हाती येतो
प्रेमाचा नि आठवांचा
ठेवा वृद्धिंगत होतो

मुग्ध बालपणी सवे
हळूहळू फुलतांना
जीवनाच्या घडणीत
साथ सोबत घेतांना

निरपेक्ष वर्षेगत
माया ती पांघरताना
जीवना मी धन्य झालो
नाते असे जपतांना

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे

Kavites
athikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इथे तिथे

इथे तिथे ******* रे ते गाव माझे होते  की हे गाव माझे आहे मज कळेना काहीच हे भास कशाचे आहे तिथे खूप यातायात  होते चालणे उन्हात  पण...