गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

प्रेत जळल्या नंतर ....





प्रेत जळले
स्मशान हलले  
लाकडी धुरात
जग पांगले  

गेले ते गेले
चला राहिले
याद करत 
बाटलीस भिडले

काय भरोसा
असे उद्याचा
चकना राहीला
आज तयाचा

गुण आठवत
कुणी रडले
कुणी उस्न्यावर
पाणी सोडले

काही तरी
हवाच होता                  
हा ही बहाणा
वाईट नव्हता

असेच कारण
होऊ आपण
मनोमनी ते
होते जाणून 
 
ती ही मग
जाणीव गेली
नशा दाटली
हवी असली

बोंब उसळली
का रे गेला
उगाच व्यर्थ
उरला कल्ला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नर्मदेच्या काठावर

नर्मदेच्या तीरावर  ************ रस्त्याच्या घड्याळावर पायाचे काटे चालतात अंतर हीच वेळ असते असा प्रवास चाले सतत  कधी भेटतो तीर सु...