सोमवार, ६ एप्रिल, २०१५

पावूस



आणखी पन्नास वर्षांनंतर
पावूस असा नाही पडणार  
कुठे कमी तर कुठे जास्त
मर्जी त्याची नाही चालणार
  
आकाशात होतील कालवे
मेघ अडविण्या वातद्वार
हवा तिथे हवा तेवढाच
पावूस पडेल धुवांधार

अशी जादू विज्ञानाची
दुनिया नक्की पाहणार
भगीरथाचे वंशज आम्ही
ही किमया साधणार

गळा कुणी ना बांधेल दोर
कुणी कधी ना जहर पिणार
कुठले ना घर उजाड होणार
हसेल स्वप्न हिरवेगार  

पाण्याचा न होईल व्यापार 
नसेल सावकार ना लुटमार
बळी राजा माझा इथला
राज्य वरुणावर करणार  



विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बीज

बीज **** मी घेवून चार बीजे आलो माळरानावर  दूरवरच्या देशावर खरेच ते रखरखीत होते  आणि पाहिले डोकावून तिथल्या दऱ्या खोऱ्या  तर त्या...