शुक्रवार, २४ एप्रिल, २०१५

जीवाश्म




मी नक्कीच विसरलोय    
असे  वाटत असेल तुला    
मग पांघरुनी मनावर
असशील तू जन्म घेतला

असेच सारे समज तुझे
हवेत सखी वाढायला
नवे गांव नवा रस्ता
हवा पुन्हा चालायला 

काही काही जनावर
फार द्वाड असतात
मेले तरी खोलवर ते
अश्मी होवून राहतात

तसाच काहीसा आहे मी
उकरले की दिसणार
पण असे जड जीवाश्म
त्याने काय फरक पडणार

तसा अर्थ काहीच नाही  
कुठल्याही पाषाणाला
कळणाऱ्याला कळला तर
वा जाई पायी लाथाडला
   
बाकी सरो गोष्ट माझी
फक्त उरो तुझे नाव
या माझ्या असण्यालाही
विसरून जावो सारा गाव


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कृपा कल्लोळ

कृपा कल्लोळ  ******* काय माझी गती अन् काय मती  तुज दयानिधी भेटू शके काय माझी श्रद्धा काय ते साधन  तुज बोलावून घेऊ शके  अवघा देहा...