सोमवार, २० एप्रिल, २०१५

फुलबाग जळल्यावर...





फुलबाग जळल्यावर ठरवले
आता या वाटेला पुन्हा जायचे नाही
ज्वारी बाजरी मका कापूस
दुसरे पिक घ्यायचे नाही
फार काही नाही मिळाले तरी
उपासमार तर होणार नाही
पोट भरेल घर चालेल जरी
माडी घरावर चढणार नाही

पण जाता जाता रस्त्याने  
दिसतात कधी कुणाचे बगीचे
आकाश झगझगीत रंगाचे
श्वास होतात धुंद फुलांचे
डळमळतो निश्चय अन
पाय जणू होतात ओंडक्याचे
  
मग त्या दिवशी
बाजरीच्या बाजारात फिरता फिरता
मी विचारू लागतो
फुलांचे बियाणे ऋतुचा कल
अन बाजाराचं मागणे
तेव्हाच डोळ्यासमोर येतात
थकलेले आईबाप
काटकसरी बायको
शाळेत जाणारी पोरं
गोठ्यातील जनावरं  
अन मी पुन्हा घरी येतो तेव्हा
आणलेले असतात तेच
बाजरीचे करडईचे अन तिळाचे बियाणे
घट्ट मनाने

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

होशी दत्ता

होशील दत्ता ********* कुणासाठी होशी दत्ता तू रे देव  स्वीकारशी भाव हृदयीचा ॥१ कुणासाठी होशी दत्ता तू रे बाळ  कृपाळ प्रेमळ लीलाधर...