रविवार, ५ एप्रिल, २०१५

मी जगलोच नाही






इतकी वर्ष इथे आहे मी
इथला कधी झालोच नाही

किती पहिले देश दुरुनी
कुठे कधीही टिकलोच नाही

कथा वादळी कशी कळावी
सागरा जर भिडलोच नाही

सदा सांभाळी बूट विदेशी
कधी देवळी शिरलोच नाही

जगुनिया काडेपेटीत संपलो
अंगार कधी झालोच नाही

हा फेकावा जन्म म्हणे मी
भीतीने धजावलोच नाही

मरणे ते तर दूर राहिले
अजूनी मी जगलोच नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नर्मदामाय

नर्मदामाय ********* माझे येणे तुझ्या दारी  घडेल गं कधी माय मनातील आस माझ्या पुर्णत्वा जाईल काय ॥ तुझे जळ खळखळ  मधू रव नादमय शिरा...