शुक्रवार, ३० जानेवारी, २०१५

प्रेम अन मैत्री






ठिक सखी जावू दे ते  
मना लावून घेवू नकोस
माझ मन मोडलं म्हणून
तूच अशी रडू नकोस

मित्र होतो आपण सदैव
मित्रच राहणार आहोत
उठले होते वादळ इवले
विसरून जाणार आहोत

होतं असं कधी कधी
उगाच पावूस पडतो कधी
प्रेम मैत्री मधली सीमा
उमजत नाही कधी कधी

उद्या पुन्हा भेटू या
तश्याच गप्पा मारू या
उणे दुणे गप्पा खोड्या   
त्याच रस्त्याने जावू या

विक्रांत प्रभाकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...