शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३

म्हातारपण

म्हातारपण
********

कुणालाही कधी काही मागू नये 
अन् म्हातारे झाल्यावर 
कुणावरही अवलंबून राहू नये 
चांगली असतील मुले तर ठीक आहे 
नाही तर आपणच आपली वाट 
वेगळी केलेली बरे
चार पैसे गाठीला ठेवलेले 
तर कधीही चांगली असते 
आपल्या बचतीत कुठलेतरी 
वृद्धाश्रमात शोधून सुखात जगणे 
हे सुद्धा चांगलेच असते 

प्रिय असतात नातलग अन्
सांभाळतात मुले नातवंडे
अहो भाग्य नाही या परते 
पण सगळेच काही 
एवढे नशीबवान नसतात 
वृद्धाश्रम किंवा वानप्रस्थाश्रम 
त्यांच्यासाठीच असतात
तिथे जगावे मस्त आनंदात 
नवनवे मित्र जमवत 
नवनव्या गोष्टी शिकत 
नवीन छंद जोपासत 
राहावे सदैव वाहत गंगेगत 
मागील सारे किनारे विसरत 

मला सांभाळा रे 
अशी  अर्ज आर्जवे नकोत 
सांभाळत नाही म्हणून 
शिव्या शापही नकोत 
मुले जन्माला येतात ती
आपल्या आणि त्यांच्या प्रारब्धाने 
पुरे करण्यास काही मागील देणे घेणे
तर मग जे वाट्याला आले 
ते भोगणे क्रमप्रात आहे

अपेक्षात अडकणे म्हणजे 
संसारात अडकणे आणि 
संसारात अडकणे म्हणजे 
जन्मा मरणाच्या चक्रात अडकण
म्हणून सर्व अपेक्षांचा अंत जिथे होतो 
त्या भक्तीसागरात स्वतःला लोटून देणे 
किंवा कर्मयोगाचा कर्तव्याचा पथ पकडून
त्या मार्गाने चालत राहणे 
हेच तर अध्यात्मात शिकणे असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 

1 टिप्पणी:

  1. खूप छान सर, मनुष्यचा जीवनात दुसऱ्या कडून अपेक्षा करणे हेच मोठे दुःख आहे

    उत्तर द्याहटवा

मेघ सावळी

मेघ सावळी ******** मेघ सावळे व्याकुळ ओले जेव्हा  निळ्या नभात जमले हर्षनाद तो गंभीर गहीरा ऐकून वेडे मन बावरले शामल रूप लोभसवाने  ...