शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०१५

नादान झाल्यावर





नादान झाल्यावर
कुणाला समजवण्यात
काय अर्थ असतो
हात हिसडून गेल्यावर
कुणाला थांबवण्यात
काय अर्थ असतो
ते जात आहेत बेगुमान
निर्ढावलेल्या मनानं
पैश्याच्या चमचमत्या
काळ्या डोहाकडे
देह्सुखाच्या क्षणिक
उथळ डबक्याकडे  
किती अवघड असतं
जिवलग मित्रांची अशी
घसरण पाहतांना
समोर दिसतो आहे
दु:खाचा असमाधानाचा
अपरिहार्य महासागर
पण त्यांनी डोळे मिटले आहे
ते जणू तरंगत चालले आहे
धनगंधाच्या हवेवर  
अन मला इच्छा असून
प्रार्थनाही करता येत नाही
ते सुखी राहावे म्हणून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

न्याय

न्याय ****** तीच न्याय संस्था फाशी सुनावते  तीच न्याय संस्था निर्दोषही ठरवते  व्यक्ती तीच असते  आरोपही तेच असतात  सुनावनी तशीच ह...