सोमवार, १७ ऑगस्ट, २०१५

आलो रे मित्रा !!





कवितेसाठी काविमित्राचं
कवितेच्या ग्रुपवर निमंत्रण आलं
अशी काही निमंत्रणं खरोखर
फार विरळ असतात
आणि निमंत्रण देणारे तर
त्याहून विरळ असतात
आपल्याहून कुणी चांगल लिहू शकतो
हे मनानं मानायला कवीला
फारच अवघड असतं
जरी तो वारंवार वरवर
वाह्वाचे तोरण बांधत असतो
आपल्या कवितेची तंगडी
मनी वरच ठेवत असतो
आणि इथं तर निमंत्रण..
आग्रह.. पुनःपुन्हा बोलावणं
ते सुद्धा हौशी कवीला
तर मग भागच होतं येण ...
आलो रे मित्रा !!

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझी नर्मदा परिक्रमा

माझी  नर्मदा परिक्रमा  ***************** दिनांक 8 फेब्रुवारी 26 ते 27 जून 26 अशी 140 दिवसांची  परिक्रमा नर्मदा मैयेने पूर्ण करून...