रविवार, १६ ऑगस्ट, २०१५

अंधाराचा शाप..







 
म्हटलं काढू नये
कधीच ती आठवण
पण तरीही ती येते
मी बोलाविल्यावाचून

म्हटलं सारे काही  
जावू आता विसरून
प्रत्येक रिता क्षण
डसतो स्मृती होवून

कश्यासाठी गुंता
असा हा होतो
सुटकेच्या मार्गच
सापळा का ठरतो

पुन्हा एक रात्र
किर्र अंगावर घेतो  
मध्ये दिन कुठला
कधीच का नसतो

आता अश्या रात्रीची
सवय होत आहे
मरणाची मध्यरात्रही
जवळ येत आहे

असेल उष:काल
निदान त्या त्यांनतर  
अंधाराचाच शाप
वा जन्म जन्मावर

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भक्ताचिया गोष्टी

भक्ताचिया गोष्टी ************** भक्ताचिया गोष्टी डोळा आणी पूर  भावनांनी उर भरू येई ॥१  आहाहा किती रे भाग्याचे पाईक  पातले जे सुख...