रविवार, ५ जुलै, २०१५

स्पर्श ओले..





आठवांच्या पावसाला
किती धरू कसे धरू
वेचलेले क्षण क्षण
उरी ओझे काय करू

माझ्या सवे जाईलही
माझ्या स्मरणाची गाथा
किती अन कुणा वाटू
देही डोई किती कथा

ठरलेल्या चाकोरीत
वाहुनिया जाते पाणी
नवा ऋतू नवी वर्षा
नवेपनी जुनी गाणी

सांभाळता सांभाळले
हातातून ओघळले
हळू हळू स्पर्श ओले
कुण्या हाती विसावले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तू गेल्यावर

तू गेल्यावर ********* असणे तुझे जीवनाला अवघे व्यापून होते  प्रेमानुबंध क्षणाक्षणाला सदैव बांधून होते  प्रेमवृक्ष तू आयुष्यात माझ...