ज्ञानदेव म्हणता
************
मन झाली वार्ता नसण्याची ॥१
हरवला ध्वनी कैवल्य स्पंदन
आनंद कंपण उरलेले ॥२
काळवेळ कुणी मारले गाठीला
अस्तित्व चोरीला गेले काय ॥३
पण भय चिंता नव्हती किंचित
स्वयंप्रकाशात आत्मतत्व ॥४
विक्रांत सरला स्वर शब्द भाव
दशा ज्ञानदेव येणे नाव ॥५
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
☘☘☘☘ 🕉️ .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा