सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

कवितेचे ऋतू

कवितेचे ऋतू
*********
मनाच्या मातीत
निजलेल्या कविता
वाट पाहतात
कुणाच्या स्पर्शाची
हलकेच जागवण्याची
कोवळ अंकुरांची

काही कवितांना
मिळतो तो ऋतू
उमलून देणारा
स्वप्न जागवणारा
आकाशात नेणारा

पण ज्या कविता
कधी अंकुरत नाही
अंतर उघडत नाही
त्या कवितांचे संपणे
अपरिहार्य असते
निसर्ग नियमानुसार

पण त्या त्यांच्या
विखुरल्या कणातून
हरवल्या पणातून
मनाची माती जाते
अधिक सुपीक होऊन

कारण जगणे म्हणजे
त्या मातीचे गाणे असते
कविता सृजल्या तरीही
अथवा करपल्या तरीही


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गाणे

गाणे **** काही उरली सुरली  माझी निरोपाची गाणी घेई उचलूनी हाती देई दूर वा सोडुनी ॥१ मुठ करता रिकामी  मुठ मुठ न उरते  होते साठवले ...