सोमवार, १८ मार्च, २०१३

विमालाजी गेल्यावर





खरच सांगतो,
विमालाजी गेल्यावर
मी इतका रडलो की
आई गेली तेव्हाच
तसा रडलो होतो .
विमलाजीवर आपण
किती प्रेम करतो
हे हि तेव्हाच कळले
खरतर ,

विमलाजींचा संबंध
म्हणजे ,
त्यांच्या पुस्तकांचा
अन तीन पत्रांचा

पण...
माझ्या आयुष्यावर
सर्वाधिक प्रभाव पाडणार
व्यक्तिमत्व केवळ त्यांचेच.

असे म्हणतात
आईवडिलांकडून आपल्याला
काही गोष्टी मिळतात
आनुवांशिक ,

तसे माझे हे मन
मला विमालाजींकडून
मिळाले आहे.
जरी अजून ते
मौनात नाही गेले,
ध्यानात नाही रंगले,
पण माझे त्यांचे नाते
मी पक्के जाणले आहे.

 विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...