सोमवार, १८ मार्च, २०१३

जे.कृष्णमूर्तीच्या पुस्तकात

जे.कृष्णमूर्तीच्या पुस्तकात
एकदा मला पाडगावकरांची
कविता सापडली .
तेव्हा पासून मी
पाडगावकरांची कविताच
वाचू लागलो .
वाचता वाचता एक दिवस
तिथे मला पुन्हा
जे.कृष्णमुर्ती भेटले
आणि म्हणाले
“ कळले का मी म्हटले होते ते, 
लिहलेली कविताच
फक्त कविता नसते!

मग मी पाडगावकरही  
ठेवून दिले.
कारण,मला आता 
शब्दात नसलेली कविता
कळू लागली होती .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...