रविवार, १७ मार्च, २०१३

ध्यान (ओशोची पत्र कविता अनुवाद )






ध्यानातून काहीही मिळवायची
आकांक्षा
सर्व प्रथम मनातून काढून टाका  .
अगदी सहज पणे ध्यान करा .
जे घडायचे ते घडू द्या  .
एक दिवस अगदी सहज
सारे काही घडू लागेल.
प्रयत्नांनी ध्यान कधीच होत नाही .
खरतर ,
प्रयत्न हाच अडथळा असतो
प्रयत्नात आणि अभ्यासात
एक प्रकारचा तणाव असतो
एक प्रकारची अपेक्षा असते
अगदी शांतीची अपेक्षा सुद्धा
अशांती निर्माण करते
हा तणाव जायला हवा.
ज्या क्षणी हे पटते
दैवी शक्तीचे अवतरण होते.
मी हे करतो
हे वाटणेच थांबवा.
त्या ऐवजी अनुभूत करा.
मी मला, स्वत:ला
त्याच्या हवाली करत आहे.
हेच समर्पण आहे.
स्वत:चे संपूर्ण समर्पण करा.
जेव्हा हे कराल तेव्हाच
अगाध रिक्त्ततेच प्रवेश होईल.
शरीर आणि श्वास शांत होईल.
तुम्ही म्हणाल ,
हे तर मनाने सुद्धा घडते!
पण जेव्हा मन जाते,
तेव्हा जे घडते,
ते अवर्णनीय असते.  
अनुवाद--विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भक्ताचिया गोष्टी

भक्ताचिया गोष्टी ************** भक्ताचिया गोष्टी डोळा आणी पूर  भावनांनी उर भरू येई ॥१  आहाहा किती रे भाग्याचे पाईक  पातले जे सुख...