रविवार, ३ मार्च, २०१३

लग्नाची गोष्ट




नवीन लग्न झाल्यावर
सुख येते अंगावर
सुखाच्या लाटेवर
दिवस जातात भरभर .
हळू हळू सुखाची
नशा जाते उतरत
बारीक सारीक गोष्टी
मग राहतात खुपत .
वडीलधाऱ्यांनी दिलेला
मंत्र तडजोड आठवत
आवडी निवडीस जातो
थोडी मुरड घालत .
गुणदोषां सकट
संसार चालतो ओढत
मुलाबाळात कामात
वर्ष जातात उलटत .
एक दिवस अचानक
मुलं  मोठी होतात
एकटेच आहोत आपण
येते आणि ध्यानात .
ज्याला प्रेम मानलं होत   
ते काही वेगळच होत
तडजोडी मग साऱ्या
वाटू लागते फरफट .
अश्यावेळी काय करावे
कुणासाठी जगावे
सार सार सोडून दयावे
का दिवस रेटत जगावे .
एका कडेलोटावर
येवून जीवन उभे राहते
निर्णय काही घेतला तरी
हार हि आपलीच असते .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी ********* मनावरी गोंदलेले नाव तुझे हळुवार सांग तुला दावू कशी प्रेम खूण अलवार ॥१ डोळ्यातील चांदण्यांना तुझ्या ...