रविवार, ६ जानेवारी, २०१९

काही कथा

कथा

साऱ्याच कथा जीवनाच्या
कधी नसतात यशोगाथा
साऱ्याच पौर्णिमा नभातल्या
न दावतात प्रकाश वाटा

काही अडतात अडखळतात
मुक थांबतात सुन्या कडेला
काही हरतात पथ सोडतात
हरवून जातात आडवाटेला

त्या हरवल्या प्रवाशाची
खंत काळ पुसून टाकतो
शिशिरात होते पानगळ
वृक्ष तटस्थ उभाच राहतो

कोण जगतो काय कशाला
ज्याचे असते श्रेय तयाला
मनातील या क्षण जगताला
अर्थ नसतो इथे असण्याला

सारे घडते कळल्यावाचून
विश्व चालते ठरल्यावाचून
लहरी मधून लहर जन्मते
लहर जाते लहरीत हरवून

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

होशी दत्ता

होशील दत्ता ********* कुणासाठी होशी दत्ता तू रे देव  स्वीकारशी भाव हृदयीचा ॥१ कुणासाठी होशी दत्ता तू रे बाळ  कृपाळ प्रेमळ लीलाधर...