बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५

बांडगुळे





ते इथले नव्हते कधीच
आणि असणार नाहीत
बांडगुळेच वृक्षावरची   
कधी वृक्ष होणार नाहीत

ते शोषतील रस इथला
नि फुलतील बहरतील
मारतील वृक्ष सारा पण
धन्यवाद देणार नाहीत

रूप त्यांचे गंध त्यांचा अहा
असे किती किती अलौकिक
चोरीची सारीच मिळकत
कबुल करणार नाहीत

आणि पुन्हा फडफडूनी
वाढ होत नाही म्हणुनी
शोक त्यांचा रानावनातील 
कधी कधी थांबणार नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वारी

वारी ***** महाद्वारी दाटीवाटी लाखो भक्त चालतात आषाढीच्या सोहळ्यात  धुंद होत नाचतात  मैलोमैल रांग इथे तासोंतास लागतात क्षणभर भेटी...